मराठी व हिंदी या दोनही भाषा देवनागरी लिपित लिहिल्या जात असल्या मुळे श्रीहनुमान चालीसा चे मराठीत भाषांतर करण्याची आवशक्ता नहीं आहे।
हनुमान चालीसा ही १६व्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेली एक अवधी भाषेतील काव्यात्मक रचना आहे. ही रचना भगवान हनुमान यांना समर्पित आहे. या काव्यात एकूण ४३ छंद आहेत – सुरुवातीचे दोन परिचयात्मक दोहे, ४० चौपाया आणि शेवटी एक दोहा.
हनुमान चालीसामध्ये एकूण ४१८ शब्दांचा वापर करण्यात आला आहे. हनुमान चालीसामध्ये एकूण १०४१ अक्षरे आहेत. हनुमान चालीसाचा पाठ करताना १० वेळा प्रभु श्रीरामांचे नाव घेतले जाते.
पहिला परिचयात्मक दोहा ‘श्री गुरु’ या शब्दांनी सुरू होतो, जो शिवांना संदर्भित करतो, कारण त्यांना हनुमानांचा गुरु मानले जाते.पहिल्या दहा चौपायांमध्ये हनुमानांच्या शुभ रूपाचे, ज्ञानाचे, गुणांचे, शक्तीचे आणि शौर्याचे वर्णन आहे.
अकराव्या ते विसाव्या चौपायांमध्ये रामसेवेत हनुमानांनी केलेल्या कार्यांचे वर्णन आहे. यामध्ये अकराव्या ते पंधराव्या चौपायांमध्ये लक्ष्मणांना पुन्हा जिवंत करण्यात हनुमानांची भूमिका सांगितली आहे.एकविसाव्या चौपाईत, तुलसीदासांनी हनुमानांच्या कृपेची आवश्यकता दर्शवली आहे.
शेवटी, तुलसीदास सत्कळ भावनेने आणि सूक्ष्म भक्तीने हनुमानांना अभिवादन करतात.
अंतिम दोह्यामध्ये, पुन्हा हनुमानजींना विनंती केली आहे की राम, लक्ष्मण आणि सीतेसह आपल्या हृदयात सदैव वास करा.

श्री हनुमान चालीसा मराठी
चालीसा : | श्री हनुमान चालीसा |
लेखकत्वi: | गोस्वामी तुलसीदासजी |
Lable: | T-Series |
Read in – English / हिन्दी / ଓଡିଆ / বাংলা
चालीसा : श्री हनुमान चालीसा मराठी अर्थ सहित (Hanuman Chalisa Lyrics With Marathi Meaning)
॥ दोहा ॥
श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।
बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥
अर्थ- श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मन रुपी आरशाला
पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की चारी फल
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन-कुमार ।
बल बुधि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार ॥
अर्थ- हे पवन कुमार! मी आपलं सुमिरन करतो. माझं शरीर आणि बुद्धी निर्बल
असल्याचं आपण तर जाणतात. मला शारीरिक बल, सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझे
दु:ख आणि दोषांचे नाश करावे.
॥ चौपाई ॥
जय हनुमान ज्ञान गुन सागर ।
जय कपीस तिहुँ लोक उजागर ॥०१॥
अर्थ- श्री हनुमान जी! आपला विजय असो. आपलं ज्ञान आणि गुण अथाह आहे. हे
कपीश्वर! आपली जय असो. तिन्ही लोक, स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताल लोकात आपली
कीर्ती आहे।
राम दूत अतुलित बल धामा ।
अंजनी-पुत्र पवनसुत नामा ॥०२॥
अर्थ- हे पवनसुत अंजनी नंदन! आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणी नाही।
महाबीर बिक्रम बजरंगी ।
कुमति निवार सुमति के संगी ॥०३॥
अर्थ- हे महावीर बजरंग बली! आपणात विशेष पराक्रम आहे. आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात।
कंचन बरन बिराज सुबेसा ।
कानन कुण्डल कुंचित केसा ॥०४॥
अर्थ- आपण सोनेरी रंग, सुंदर कपडे, कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात।
हाथ बज्र और ध्वजा बिराजै ।
काँधे मूँज जनेऊ साजै ॥०५॥
अर्थ- आपल्या हातात बज्र आणि ध्वजा आहे आणि खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे।
शंकर स्वयं केसरी नंदन ।
तेज प्रताप महा जग बन्दन ॥०६॥
अर्थ- शंकराचे अवतार! हे केशरी नंदन आपल्या पराक्रम आणि महान यशाची संसार भरात वंदना होते।
विद्यावान गुनी अति चातुर ।
राम काज करिबे को आतुर ॥०७॥
अर्थ- आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात, गुणवान आणि अत्यंत कार्य कुशल होऊन श्री रामाचे काम करण्यास उत्सुक असतात।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया ।
राम लखन सीता मन बसिया ॥०८॥
अर्थ- आपण श्री राम चरित ऐकण्यात रस घेता. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या हृद्यात वास करतात।
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।
बिकट रूप धरि लंक जरावा ॥०९॥
अर्थ- आपण आपलं लहानसा रूप धारण करून सीतेला दाखवले आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केले।
भीम रूप धरि असुर सँहारे ।
रामचन्द्र के काज सँवारे ॥१०॥
अर्थ- आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्री रामचंद्रांच्या उद्देश्यांना यश मिळवून दिले।
लाय संजीवन लखन जियाये ।
श्रीरघुबीर हरषि उर लाये ॥११॥
अर्थ- आपण संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले ज्याने आनंदी होऊन श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावले।
रघुपति किन्ही बहुत बड़ाई ।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ॥१२॥
अर्थ- श्री रामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हटले की तुम्ही माझ्या भरत सारख्या भावाप्रमाणे आहात।
सहस बदन तुम्हरो जस गावैं ।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं ॥१३॥
अर्थ- श्रीरामाने आपल्या हे म्हणत हृदयाशी लावले की तुमचं यश हजार मुखाने गाजवण्यासारखे सारखे आहे।
सनकादिक ब्रम्हादि मुनीसा ।
नारद सारद सहित अहीसा ॥१४॥
अर्थ-श्री सनक, श्री सनातन, श्री सनन्दन, श्री सनत्कुमार आदि मुनी ब्रह्मा आदि देवता नारद, सरस्वती, शेषनाग सर्व आपले गुणगान करतात।
जम कुबेर दिगपाल जहाँ ते ।
कबि कोबिद कहि सके कहाँ ते ॥१५॥
अर्थ- यमराज, कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा ।
राम मिलाय राज पद दीन्हा ॥१६॥
अर्थ- आपण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून उपकार केले, ज्यामुळे ते राजा झाले।
तुम्हरो मंत्र बिभीषन माना ।
लंकेस्वर भए सब जग जाना ॥१७॥
अर्थ- आपल्या उपदेशांचे विभीषणाने पालन केलं ज्याने ते लंकेचे राजा झाले, हे सर्व जगाला माहिती आहे।
जुग सहस्त्र जोजन पर भानु ।
लील्यो ताहि मधुर फल जानू ॥१८॥
अर्थ- सूर्य अती दूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोहचण्यास हजार युग
लागतात. अशा दोन हजार योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ
म्हणून गिळून गेला।
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं ।
जलधि लाँघि गये अचरज नाहीं ॥१९॥
अर्थ- आपण श्री रामचंद्राची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलं, यात आश्चर्य करण्यासारखं नाही।
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ॥२०॥
अर्थ- संसारात जितकेही अवघड काम असलं तरी ते आपल्या कृपेने सोपं होऊन जातं।
राम दुआरे तुम रखवारे ।
होत न आज्ञा बिनु पैसारे ॥२१॥
अर्थ- श्री रामचंद्राचे दारावरील आपण राखणदार आहात, ज्यांच्या आज्ञेशिवाय
कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही अर्थात आपल्या प्रसन्न केल्याशिवाय राम
कृपा दुर्लभ आहे।
सब सुख लहै तुम्हारी सरना ।
तुम रच्छक काहू को डर ना ॥२२॥
अर्थ- आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतं, आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती राहत नाही।
आपन तेज सम्हारो आपै ।
तीनों लोक हाँक तें काँपै ॥२३॥
अर्थ- आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही, आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात।
भूत पिसाच निकट नहिं आवै ।
महाबीर जब नाम सुनावै ॥२४॥
अर्थ- जेथे महावीर हनुमानाचे नाव घेतलं जातं तेथे भूत-पिश्शाच जवळ देखील फिरकत नाही.
नासै रोग हरै सब पीरा ।
जपत निरन्तर हनुमत बीरा ॥२५॥
अर्थ- वीर हनुमान ! आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीश्या होतात।
संकट तें हनुमान छुडावे ।
मन क्रम बचन ध्यान जो लावै ॥२६॥
अर्थ- हे हनुमान ! विचार, कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटांपासून मुक्त करतात।
सब पर राम तपस्वी राजा ।
तिन के काज सकल तुम साजा ॥२७॥
अर्थ- तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे।
और मनोरथ जो कोई लावै ।
सोहि अमित जीवन फल पावै ॥२८॥
अर्थ- ज्यांच्यावर आपली कृपा असते, त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फल प्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगता येऊ शकतं नाही।
चारो जुग परताप तुम्हारा ।
है परसिद्ध जगत उजियारा ॥२९॥
अर्थ- चारी युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुगात आपलं यश पसरलेलं आहे, जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे।
साधु सन्त के तुम रखवारे ।
असुर निकन्दन राम दुलारे ॥३०॥
अर्थ- हे श्रीरामाचे लाडके! आपण सज्जनांची रक्षा करतात आणि दुष्टांचा विनाश।
अष्टसिद्धि नौ निधि के दाता ।
अस बर दीन जानकी माता ॥३१॥
अर्थ- आपल्याला देवी जानकीकडून असे वरदान प्राप्त आहे, ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकतात। अणिमा, महिमा,गरिमा,लघिमा,प्राप्ती,प्राकाम्य,ईशित्व,वशित्व
राम रसायन तुम्हरे पासा ।
सदा रहो रघुपति के दासा ॥३२॥
अर्थ- आपण निरंतर श्री रघुनाथाच्या शरणात राहतात, ज्यामुळे आपल्याकडे
वृद्धापकाळ आणि असाध्य आजारापणाला नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे.
तुम्हरे भजन राम को पावै ।
जन्म जन्म के दुख बिसरावै ॥३३॥
अर्थ-आपलं भजन केल्याने श्री राम प्राप्त होतात आणि जन्म जन्मांतराचे दु:ख दूर होतात।
अन्त काल रघुबर पुर जाई ।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई ॥३४॥
अर्थ-आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम, अर्थात वैकुंठात
जाता येऊ शकतं आणि जिथे जन्म मात्र हरि भक्तच्या रूपात मिळतो।
और देवता चित्त न धरई ।
हनुमत सेही सर्ब सुख करई ॥३५॥
अर्थ-हे हनुमान ! आपली सेवा केल्याने सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होतात, मग इतर देवतांची गरज भासत नाही।
संकट कटै मिटै सब पीरा ।
जो सुमिरे हनुमत बलबीरा ॥३६॥
अर्थ- हे वीर हनुमान ! आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीश्या होतात।
जय जय जय हनुमान गोसाईं ।
कृपा करहु गुरुदेव की नाईं ॥३७॥
अर्थ-हे स्वामी हनुमान ! आपली जय असो, जय असो, जय असो! आपली माझ्यावर कृपालु श्री गुरुसमान कृपा असावी।
जो सत बार पाठ कर कोई ।
छूटहि बन्दि महा सुख होई ॥३८॥
अर्थ- शंभर वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल.
जो यह पढ़ै हनुमान चालीसा ।
होय सिद्धि साखी गौरीसा ॥३९॥
अर्थ-भगवान शंकर साक्षी आहे की याचे पाठ केल्याने
सर्व मनोकामना पूर्ण होतील, निश्चित यश प्राप्ती होईल.
तुलसीदास सदा हरि चेरा ।
कीजै नाथ हृदय मह डेरा ॥४०॥
अर्थ-हे नाथ हनुमान ! तुलसीदास सदा श्रीरामाचे दास आहे. म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा.
॥ दोहा ॥
पवनतनय संकट हरन मंगल मुर्ति रूप ।
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप ॥
अर्थ-हे संकट मोचन पवन कुमार! आपण आनंद मंगळ स्वरूप आहात। हे देवराज! आपण श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा.
॥ जय-घोष ॥
बोल बजरंगबली की जय ।
पवन पुत्र हनुमान की जय ॥
॥ इति श्री गोस्वामी तुलसीदास रचित श्री हनुमान चालीसा संपूर्णम् ॥